Posts

Showing posts with the label Battle of Umberkhind

Umbarkhind trek

Image
ट्रेक उंबरखिंड विजयस्तंभ       मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा  शाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान हा  दख्खनचा सुभेदार असताना छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता.  पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर प्रचंड प्रमाणात अन्याय, अत्याचार व लुटालूट करत होता. मुघल सैन्याबरोबर समोरासमोर युद्ध करण्याएवढे सैन्यबळ नसल्यामुळे महाराजांचा नाईलाज होता.       जून १६६० ला  त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. त्यानंतर  १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने उझबेग सरदार कारतलब खानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्याच्या धाडसी योजनेवर रवाना केले. कारतलब खानासोबत सावित्रीबाई उर्फ रायबाघण तसेच मुघलांचे अनेक सरदार ह्या मोहिमेत सहभागी झालेले होते. फौजफाटा जवळजवळ ३० हजारांवर होता.       २ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्य...