Wednesday 25 July 2012

Use your Android phone’s data connection (Internet) via USB on PC !!


Share your phone’s data connection via USB
Depending on your model of Android device and your carrier, you may be able to share your Google™ Android™ device's mobile data connection with a single computer via a USB cable this is called tethering.

If your computer is running Windows 7, you typically don’t need to prepare your computer for tethering.

You can’t share your phone’s data connection and USB storage or SD card (depending on your phone) via USB at the same time.
If you are using your USB connection to copy files to or from your computer, you must disconnect first.

1. Use the USB cable that came with your phone to connect your phone to your computer.
2. Press Home , press Menu , and touch Settings to open the Settings application.
3. Touch Wireless & networks > Tethering & portable hotspot.
4. Check USB tethering.

Now you will be able to see this in status bar

USB tethering is active.

And enable DATA access over internet in phone.(Activate GPRS connection)

The phone starts sharing its mobile network data connection with your computer, via USB connection.
An ongoing notification is added to the Status bar and Notifications panel.

Next part is you must have installed drivers for Remote NDIS based internet sharing device.

See the images below and try to follow that procedure, I am sure you can do this easily.
Step 1.

Right click on Computer and select Properties.








Step 2.

Choose Device manager.




Step 3.

See Network Adapters> Remote NDIS based internet sharing device



Step 4.

Right click on "Remote NDIS based internet sharing device" And select Update Driver Software.




Step 5.





Step 6.





Step 7.




























Tuesday 10 July 2012

"रामलाल" DY Patil स्टेडीयम, नेरळ.


IPL चं पहीलं वर्ष २००८. पुण्यामधे मॅच बघायची सोय नव्हती. म्हणुन काय गप्प बसतोय होय आम्ही?. मुंबईच्या मॅचेस बघायचा जुनुन सवार असायचा आमच्यावर. त्यातल्या त्यात नेरळला आमची पसंती असायची. एक्सप्रेस हायवेने गेले की अगदी जवळ पडायचे नेरळ. मॅच पहायची तर हौस पण तिकीटे कशी काढायची?? मोठा गहन प्रश्न असायचा. सगळी चक्रे फ़िरवल्यानंतर एक धागा जोडलाच आम्ही. नेरळचे स्टेडीयम DY Patil कॉलेजचे, पिंपरीत पण DY Patil कॉलेज आहे. भुमितीतले समीकरण वापरले. DY Patil कॉलेज= IPL मॅच. संदीप आहेर कडुन अभय कोटकरांचा नंबर घेतला. अभय कोटकर म्हणजे DY Patil कॉलेजचे क्रिकेट सर्वेसर्वा. त्यांनी तिकीटांची शाश्वती दिली पण म्हणाले की तुम्हाला तिकीटे स्टेडीयम वर मिळतील. आणि तिथल्या संदीपचा नंबर दिला. त्यानंतर आम्ही फ़क्त संदीपच्या संपर्कात राहीलो. पाच तिकीटे ठेवायला सांगितली त्याला.. सगळं सेटींग मोबाईलवर. प्रत्यक्ष भेट कोणाशीही नाही. "पाण्यात म्हैस वर हिशोब". पण आपण जायचेच असं आम्ही ठरवलेलं.

मॅचच्या दिवशी सकाळी एकदा नेरळच्या संदिपला फ़ोन लावला "आम्ही येतोय पुण्यावरुन मॅच पाहायला आमची पाच तिकीटे आहेत ना? नाहीतर एवढ्या लांब येऊन घोळ नको व्हायला." संदिप, "हो आहेत, या तुम्ही... स्टेडीयमवर आल्यावर फ़ोन करा.. मी तिकीट काऊंटरवर येऊन तुम्हाला तिकीटे देईन ". जीव भांडयात पडला.. मुंबई वि. राजस्थान ८ वाजताची मॅच होती. तिकीटे सांगितलेली पाच अन मॅच बघायला निघालो चारजण. मग एका तिकीटाचे काय करायचे ह्याची तजवीज आम्ही पुण्यातुन स्टार्टर मारल्यापासुन करत होतो.. लोणावळ्यातले वडापाव खात खात आम्ही आगेकुच चालु ठेवली. आणि मजल-दरमजल करत नेरळ स्टेडीयमवर पोहोचलो. माझी ८०० फ़्लायओव्हरखाली पार्क केली आणि संदीपला फ़ोन लावत लावत तिकीट काऊंटरकडे गेलो. तिकीट काऊंटरवर संदिप नव्हता.. आईच्या गावात... आता काय करायचं?.. त्याचा फ़ोनही लागेना... मगतर आमची तंतरलीच.... आपल्याला फ़सवण्यात आले आहे.. तिकीटे नाहीत...
त्याचा फ़ोनही लागत नव्हता... स्विच ऑफ़ केला त्याने... अरे देवा ! आता काय खरं नाही.. वाचव रे बाबा..!

आम्ही प्लॅन बी कडे वळलो.. मिळतील तिथुन तिकीटे घ्यायचीच आणि काहीही झाले तरी मॅच पाहायचीच असं जाम ठरवलं आम्ही.. एक माणुस दिसलाच आम्हाला.. हातात तिकीटे नाचवत.. १००० रुपयांवाली पाच तिकीटे होती त्याच्याकडे. "चार पाहीजेत" म्हणुन आम्ही चार हजार एकत्र करुन त्याच्याकडे गेलो. तो म्हणाला "जरा साईडमें आओ"
त्याने तिकीटे वर काढली,.. मोजली.. आणि आम्ही देवाण-घेवाण करणार एवढयात एका महीला पोलासाने त्याचा हात तिकीटांसकट पकडला आणि तिकीटे जप्त केली.. "ब्लॅक करतो भडव्या.. xxx xxx xx" बराच उद्धार केला त्याचा त्यांनी.. आमचे पैसे वाचले योगेश पंडीतांच्या चतुराईमुळे.. त्याने पैसे लवकर बाहेर काढले नाहीत आणि देऊनही दिले नाहीत. नाहीतर तिकीटांबरोबर पैसेही घेतले असते (जप्त केले असते) त्या पोलिसांनी.. कसेबसे निसटलो.. आणि पैसेही जप्त झाले नाहीत.. सुटकेचा निश्वास टाकला...
आम्ही पुन्हा संदिपला फ़ोन लावु लागलो.. कसाबसा फ़ोन लागला.. फ़ोन उचलला एका मुलीने. आता ह्या नंबरवर मुलगी कुठुन आली? आम्हाला आणखीनच बनवल्यासारखं वाटलं. बुडत्याचा पाय खोलात कसा जातो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो आम्ही. तिच्या सांगण्यावरुन आम्ही थोडयावेळाने पुन्हा फ़ोन केला. मग एकदाचा संदिप फ़ोनवर बोलला. त्याचा आवाज ऐकुन परमेश्वर प्राप्तीचा अनुभव झाला आम्हाला. तो म्हणाला तुमची तिकीटे रामलाल कडे आहेत आणि तो स्टॆडीयमवर आहे. रामलालचा नंबरपण दिला आम्हाला.

आता हा रामलाल कोण?? आणि त्याला शोधायचा कुठे? सगळंच अधांतरी. माझी तर पक्की खात्रीच झालेली, आपल्याला फ़सवलेलं आहे. आता मिळतील तिथुन तिकीटे घ्या आणि मॅच बघा. रामलालला फ़ोन चालुच होते. रामलाल स्टेडीयमच्याबाहेर थांबलेला होता. "मैं खडा हुं ईधर, आप आईये और तिकीट ले जाईये". ईधर खडा हुं.. स्टेडीयम म्हणजे काय बस स्टॉप आहे का?? कुठे शोधणार त्याला?? संभाषणावरुन जरा व्यक्ती परीचय करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याचा ठिकाणा सांगता येत नव्हता. फ़ोनमधुन बोलताना गाडयांचे आवाज यायचे, ह्याच्यावरुन तो कुठेतरी रोडवरच थांबलेला होता. मग त्याला विचारले "तुझ्या आजुबाजुला काय काय आहे सांग?" एवढ्यात सुद्धा मी एका सरदारजी कडे तिकीट घ्यायला गेलोच पण त्याच्याकडे नेमकी तीनच तिकीटे होती. असेही हे पैसे जप्तच होणार होते मग जाउ दे. पण नशीबातच नव्हते.

रामलालने सांगितले की त्याच्या बाजुला बॅंक ऑफ़ बडोद्याचे ATM आहे आणि तो तिथे झाडाखाली उभा आहे. मग आम्ही ससाण्यासारखे निघालो स्टेडीयमच्या भोवतीने... बॅंक ऑफ़ बडोद्याचे ATM शोधत... त्यातही पोलिसांचा ससेमिरा. ईकडुन जाऊ नका.. तिकडुन जाऊ नका... बॅंक ऑफ़ बडोद्याचे ATM दिसले एकदाचे आणि IPL चा टि-शर्ट घातलेला रामलाल त्या झाडाखाली.. एवढे वर्णन माहीत झाल्यावर त्याला ओळखणे एवढे का अवघड होते.. त्यात तो आमच्यासाठी पंचप्राण घेउन आलेल्या हनुमानासारखा.. १५ मीटरवरुनच आवाज दिला "ऒ रामलाल" त्या हाकेमधे एक आगतिकता होती... वाळवंटात प्यायला पाणी सापडल्यानंतरची तृप्तता होती. "ऒ रामलाल" करत आम्ही त्याच्याजवळ गेलो.. तर रामलाल एकदम भावनात्मक झालेला. त्याच्या चेह-यावर एक आकस्मिक चमक दिसत होती.
रामलाल आश्चर्यचकीत होऊन म्हणाला "ये बताओ, मुझे कैसे पहचाना?"
"अरे आपको कौन नहीं पहचानता रामलाल, आप को तो देखतेही पहचान गये हम"
हे ऐकुन एक मस्त स्मितरेषा त्याच्या चेह-यावर झळकुन गेली. एक समाधान त्याच्या चेह-यावर उमटले. केवढा खुष दिसत होता तो. त्या एका हाकेने...
"मुझे कैसे पहचाना?" हे जवळ-जवळ चार ते पाच वेळा विचारले त्याने.
"वो बात हुई थी पांच टिकट की, हम पुनेसे आये है "
"हां मैने संभालके रखे है, आपके पांच टिकट, ले लो"
"रामलाल, देखो ऐसा है अब हमें सिर्फ़ चार टिकट चाहीए"
"ये नहीं हो सकता, आपको पांच टिकट लेने पढेंगे"
गंम्मत म्हणजे त्याला तिकीटे मागणारी चार-पाच माणसं त्याच्या भोवती फ़िरत होती. पण तो त्यातल्या एकालाही तिकीट देत नव्हता. केवढे सोपे होते ते.... आमचे एक्स्ट्रा तिकीट त्यातल्या एकाला विकुन मोकळे व्हायचे.
असे केले तर मग तो रामलाल कसला??
आम्ही आपले चारवरच समाधानी झालो होतो.
पुन्हा तोच संवाद...
"देखो ऐसा है, अब हमें सिर्फ़ चार टिकट चाहीए"
"आपको पांच टिकट लेने ही पढेंगे"
रामलाल काही केल्या ऐकेना. भाबडा होता बिचारा. अतिशय प्रामाणिकही वाटला.
आता पुणेरी तडका दिल्याशिवाय काही गत्यंतर दिसत नव्हते. त्याच्याकडुन पाच तिकीटे घेतली. आणि एक तिकीट तिथेच उभ्या असलेल्या माणसाला विकले १०० रुपये जास्त घेऊन. आणि ते पैसे रामलालला देऊ केले तर ते पण तो घेईना.. आता कमाल झाली.. आयुष्यात खुप व्यक्ती पाहील्या पण हा अनुभव जरा विलक्षणच होता. आता आम्हाला सरप्राईज पॅकेज भेटले होते. ज्या तिकीटांसाठी आम्ही जीवाचे रान करत होतो, ती तर आम्हाला सहज मिळाली. दु:खाचा डोंगर पार करुन आम्ही सुखाच्या हिरवळीवर आलो होतो.
रामलालचा प्रतिसाद आम्हाला थक्क करणारा होता. दोन शक्यता मी मनामधे घोळु लागलो. एकतर त्याला एवढ्या प्रेमाने कुणी हाक मारत नसावे अथवा त्याचा सिक्रेट ठिकाणा आम्ही शोधल्याचा त्याला आनंद झाला असावा. काहीही असो एक ठसा उमटवुन गेला तो.. कायमचा.....

आम्हालाही मॅच पाहायला उशिर होत होता. आम्ही त्याचे आभार मानुन निघालो..
असा हा रामलाल ! मी कधीही विसरु शकत नाही. केवळ अविस्मरणीय...!

"रामबाण"


रामबाण हा शब्द कधी ऐकलाय? कुठे? औषधवाल्याकडे पाटी लावलेली असते. "रामबाण उपाय". औषधवाले रामाच्या बाणाची उपमा देतात त्यांच्या औषधाला. औषधाला बाणाची उपमा ! मलाही नवल वाटते ह्या गोष्टीचे. म्हणुन थोडंसं सविस्तर जाणुन घेऊ. रामाचा बाण म्हणजे अचुक,अभेद्य, लक्ष्यापासुन कधीही विचलीत न होणारा. जे लक्ष धरुन तो सोडला जायचा त्याचा भेद केल्याशिवाय तो कधीही परत आला नाही. आपल्या मिसाईल टेक्नॉलॉजीला काय घेऊन बसलात. आपल्या मिसाईलचे co-ordinates मागे पुढे होतील पण रामाचा बाण कधीही मागे पुढे झाला नाही. असा हा रामबाण.. पुर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा सातवा अवतार म्हणजे प्रभु श्रीराम. ह्या अवतारात त्यांचे अस्त्र होते धनुष्यबाण आणि त्याच्या जोडीला विश्वामित्रांचा अक्षय भाता.त्यांच्या ह्या बाणाने असंख्य राक्षसांचे लिलया प्राण घेतले. अचुक वेध, लक्ष्य कोणतेही असो, कधीही वाया न जाणारा असा हा प्रभु श्रीरामांचा बाण "रामबाण" .

रामबाणाच्या शक्तीचा ख-या अर्थाने पहीला अनुभव घेतला तो मारीच राक्षसाने. यज्ञभंग करणे म्हणजे त्याचा हातचा मळ. कोणीही त्याला अडवण्याची हिंम्मत केलेली नव्हती. मारीच हा ख-या अर्थाने मायावी राक्षस होता. अफ़ाट शक्ती असलेला मारीच राक्षस त्याने कैक देव-देवतांना पराभुत केलेले होते. त्यामुळे देव-देवताही त्याच्याबरोबर पंगा घेत नसत. असाच एके दिवशी नित्यनियमित यज्ञभंग करण्याच्या उद्देशाने मारीच आला. पण यावेळेस स्वत: प्रभु श्रीराम यज्ञाचे रक्षण करीत होते. यज्ञभंग करायला आलेल्या मारीचने धनुष्यबाण घेऊन सज्ज असलेल्या दोन युवकांना पाहुन छदमी हास्य केले. बिचा-याने स्वप्नातही कल्पना केली नसेल पुढे काय होणार आहे? ह्यावेळेस मारीचची गाठ प्रत्यक्ष भगवंतांशी होती. धनुष्यावर बाण चढवलेलाच होता फ़क्त मारीच पुढे यायचा अवकाश होता. वायु आणि बल प्रभुंचा बाण सुटण्याची वाट पहात होते, कधी एकदा धनुष्यातुन बाण सुटतोय आणि आम्ही तो मारीचच्या छाताडात नेऊन घुसवतोय असं त्यांना झाले होते. जसा मारीचने यज्ञामधे विघ्न आणण्याचा प्रयत्न करायला गेला तसा प्रभु श्रीरामांचा बाण धनुष्यातुन सुटला..सुssssसुsssssसु..... एवढी ताकद होती त्या बाणामधे.... केवळ तो मारीच होता म्हणुन त्याचे निभावले... त्याने तो बाण हाताने अडवला. पण बाणाचा वेग एवढा प्रचंढ होता की मारीच त्या बाणाबरोबर उत्तर भारतातुन अरबी समुद्रामधे येऊन पडला. ते सध्याचे मॉरीशस.

जेव्हा प्रभु श्रीराम दंडकारण्यामधे वनवासात होते. तेव्हा शुर्पनखाने सीतेचा द्वेष करुन सीताला मारायचा प्रयत्न केला होता. लक्ष्मणाने नाक कापल्यानंतर ती खर आणि दुषण ह्या दोन राक्षसांकडे गेली. रावणाच्या अधिपत्याखाली दंडकारण्याचे ईनचार्ज होते ते. त्यांनी १४००० राक्षसांसहीत प्रभु श्रीरामांवर आक्रमण केले. सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने बाणाने मोठ्या दगडामधे एक गुफ़ा तयार केली. केवळ सीताच त्या गुफ़ेमधे जाऊ शकेल एवढीच जागा आणि आतमधे आरामात झोपता येईल एवढ्याच आकाराची गुफ़ा लक्ष्मणाने तयार केली. आजही ती गुफ़ा पंचवटीमधे आहे. तिला "सीतागुफ़ा" म्हणतात कधी गेलात तर अवश्य पाहुन या.

१४००० राक्षसांचे सैन्य घेऊन आलेल्या खर आणि दुषण यांना प्रभु श्रीरामांनी अवघ्या १ तासामधे भुईसपाट केले. अचुक आणि अभेद्य बाणांनी १४००० राक्षसांना १ तासामधे म्हणजे सेकंदाला 3.8 राक्षस मारले त्यांनी. एकही बाण वाया गेला नाही. केवढी अचुकता होती त्या बाणांमधे......"रामबाण". जेव्हा रावणाने मारीचाला सीताहरण करण्यासाठी मदतीसाठी बोलावले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला होता.. त्याला रामाच्या बाणाचा पुन्हा अनुभव घ्यायचा नव्हता..पण रावणाने त्याला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याने प्रभु श्रीरामांच्या बाणाने मरण्याचा पर्याय निवडला.. जेव्हा तो सुवर्णमृग होऊन आला तेव्हा त्याला रामबाणाचीपुर्ण कल्पना होती.. "रामबाण" म्हणजे काय? ह्याची त्याला पुर्ण जाणिव होती. केवळ म्हणुनच तो प्रभु श्रीरामांना काही अंतरापर्यंत दुर घेऊन जाऊ शकला.तो मधेच अदुश्य होत असे आणि नागमोड्या चालीने पळत होता. पण तो प्रभु श्रीरामांच्या बाणापुढे काही काळच तग धरु शकला.. अखेर "रामबाण" त्याला लागलाच.प्रभु श्रीरामांनी त्याचा वेध घेतलाच. अशा ह्या धुर्त मायावीलासुद्धा अचुक लक्ष्य करणारा "रामबाण".

सर्वांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा !!

बासरीच्या आख्यायिका


बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात. त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो. याच 'मी'पणाच्याअहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली,'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.' अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे.. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकारगळून पडलाय . माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत. मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते. तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्या. तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.

म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही………..!

-संग्रहीत (हे लिखाण माझे नव्हे)

माझा झंझावात...!


मी सिंहगड क्लबकडुन खेळायचो तेव्हाची गोष्ट आहे.. SSPMS च्या ग्राऊंडवर OLD MONK CLUB बरोबरची मॅच. ओल्ड मॉन्क म्हणजे.. अहं.. नावावर जाऊ नका.. मिलीटरीचा खंबा नव्हे.. वय झालेल्या क्रिकेटर्सचा क्लब आहे तो... किमान मैदानावर तरी.. मैदानाबाहेर मला माहीत नाही हं... मैदानाबाहेरचा काहीतरी संबंध असु शकतो... असोत... पण ते दर वेळेस ४-५ नविन रक्ताचे क्रिकेटर घेऊन येतात. आणि समोरच्या संघाला सरप्राईज देतात. PDCA (Pune District Cricket Association) चा सर्वोच्च वैयक्तीक धावांचा विक्रम OLD MONK च्या फ़लंदाजाच्या नावावर आहे. याच्यावरुन तुम्हाला अंदाज येईल. रोहीदास माताळे सिंहगड क्लबचा कॅप्टन होता. मी जेवढया कॅप्टन बरोबर खेळलो त्यातला माझा सर्वात आवडता कर्णधार म्हणजे रोहीदास. जिंकण्याची जिद्द काय असते? हे मी त्याच्याकडुन शिकलो. त्याच्याबरोबर खेळताना मी अकराव्या नंबरपासुन सुरुवात केली होती. माझा पदार्पणाचा सामना मला अजुन आठवतोय.. जिंकायला १५ धावा हव्या असताना मी गेलो होतो. आणि जिंकायला ४ धावा असताना short midwicket ला झेलबाद झालो. सामना हरलो पण तो माझ्यावर चिडला नाही. त्याने माझ्यातल्या फ़लंदाजाला ओळखले. त्याच्याकडे पारखी नजर होती. त्यानंतर सामन्यागणिक त्याने माझी बढती केली आणि मी एक प्रमुख फ़लंदाज म्हणुन सिंहगड क्लबमधे स्थिरावलो. ४ था क्रमांक मला मिळाला. मी पण त्याचा निर्णय कधीच चुकीचा ठरवला नाही. दोन सामन्यांमधे मी हमखास एक अर्धशतक करायचो. ख-या अर्थाने अष्टपैलु म्हणुन खेळायचो मी, गोलंदाजीची सुरुवात आणि ४थ्या क्रमांकावर फ़लंदाजी. सिंहगड क्लबसाठी केलेले शतक तर लाखमोलाचे...अविस्मरणीय. पण पुढे मला सिंहगड क्लब सोडावा लागला अपरिहार्य कारणासाठी. माझ्या सुट्टीचा वार असायचा गुरुवार आणि सिंहगड क्लबच्या मॅचेस असायच्या रविवारी. नाईलाजास्तव मी क्लब बदलला. तर OLD MONK CLUB बरोबर मॅच होती. आम्ही पहीले क्षेत्ररक्षण घेतले. गद्रे सर म्हणाले होते,"आमच्याकडे आज एक अफ़लातुन गोलंदाज आहे, तुमचे काही खरे नाही." च्यायला ! म्हणलं कशाला विषाची परीक्षा..? म्हणुन आम्ही आपली पहीली फ़िल्डींग घेतली. आमची शेवटची फ़ळी अनुनभवी होती. नविन चेंडुवर जर त्या गोलंदाजाने विकेट्स घेतल्या तर झाली का पंचाईत. टारगेट चेस करुयात म्हणुन रोहीदासने फ़िल्डींग घेतली. तेव्हा Summer League चे सामने ३० षटकांचे होत असत. पण सामना ऊशिरा सुरु झाल्यामुळे २० षटकांचा करण्यात आला होता. त्यांनी ९९ धावा केल्या. आणि आम्हाला १०० धावांचे टारगेट आले. आता त्यांचा अफ़लातुन गोलंदाज.. आमचे ओपनर्स जरा टेन्शन मधेच होते राव. ओपनर्स मैदानात जातानाच मी बॅटींग पॅड बांधुन तयार असायचो. आमचा १० स्कोअर व्हायच्या आत ओपनर्स परत पॅव्हीलियनमधे.. आता काही खरं नाही. मी त्याचा पहीला चेंडु खेळलो आणि जाणवलं की खरंच काही खरं नाही. च्यामारी.. आता काय करायचं?. बजरंग बली की जय.. "जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली" मनातल्या मनात पुटपुटलो. आता आर नाही तर पार.. होऊन जाउ देत.. दोन पाऊले क्रिजच्या पुढे थांबलो आणि जी तुडवायला सुरुवात केली, "दे माय धरणी ठाय" झाले त्याला. काही स्तुतीसुमनेही उधळली त्याने माझ्यावर. मग मला अजुनच स्फ़ुरण चढले.. त्याचा कोणताही आणि कसलाही चेंडु मी सहज भिरकावुन द्यायचो सीमारेषेकडे. षटकामागे १०-१५ धावा यायला लागल्या. long On, long off आणि Mid wicket चे फ़िल्डर्स नुसते चेंडु घेऊन यायचे बॉंड्रीबाहेरचा. ख-या अर्थाने "दे घुमा के" चालु होतं. सगळे शॉट एकदम चुम्मा टाईप. मी षटकार मारण्याच्या फ़ंदात पडत नाही, नाहीतर ते पण मारले असते त्यादिवशी. त्यानंतर त्यांनी वैतागुन स्पिनर आणला. माझ्या जोडीला राजेश मंगरुळे होता. राजेशला स्पिनरला पुढे सरसावुन मारायला खुपखुप आवडते. मी राजेशला खो दिला. आता तुझी पाळी.. त्यानेही काही कसर ठेवली नाही. ऑफ़स्पिनरने गोलंदाजी चालु केली. राजेशने ऑफ़स्पिनरला पुढे सरसावत त्याचा सर्वात आवडता फ़टका मारला.. तो चेंडु Long On च्या कैक अंतरावरुन बाभळींच्या झाडाकडेला असलेल्या झोपड्यांकडे जाऊन पडला. कमीत कमी ११० मीटर. त्याचा हा शॉट एवढा आवड्ता आहे की जगातल्या कुठल्याही बॉलरने जरी त्याच्या पट्ट्यात चेंडु दिला ना की तो फ़क्त मिडविकेट्च्या बाहेर बघायचा.. बस्स दुसरं काही नाही.. त्याची SunnyTonny ची बॅट नविनच होती तेव्हा. कसाबसा चेंडु परत आला. आणि पुढचा शॉट हा पहील्याची अ‍ॅक्शन रिप्ले.. पुन्हा कमीत कमी ११० मीटर. OLD MONK आगीतुन फ़ुफ़ाट्यात गेले. आम्ही 8.2 ओव्हर्समधे 100/2 धावा केल्या आणि आमचा झंझावात संपवला. माझे सर्वात जलद अर्धशतक ह्याच सामन्यात झाले. गद्रे सर म्हणाले आमच्या अफ़लातुनच्या पार चिंध्या केल्यात राव तुम्ही.. आणि तेही हसत हसत.. अर्थातच "Well Played वसवे" म्हणत.. मला त्यांचा खिलाडुपणा जाम आवडला.

माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेत माझी भुमीका..


माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेत माझी भुमीका... अर्थातच मीच सर्वकाही "खलनिग्रहणाय सद्र्क्षणाय". माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी माझ्यावरच तर अवलंबुन आहे नाहीतरी ह्या धावपळीच्या जगात ईतरांकडुन अपेक्षा तरी कशी ठेवणार. कोणाला एवढा वेळ असतो.... सगळेच आपापल्या व्यापात अडकलेले आहेत. कुटुंबाची सुरक्षा म्हणजे कुटुंबाभोवती ’मिसाईल शिल्ड" वगैरे लावुन घेणे नव्हे, अमेरीकेने लावुन घेतलीय तशी.. ह्याची सुरुवात मुलांना नखं कापताना नेलकटर कसे पकडायचे? आणि बोटांना ईजा होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यायची ह्याच्यापासुन होते. पण एवढे करुनही ईजा होणार नाही याची काही गॅरंटी नाही... मुलेच ती... त्यांना खासकरुन "असे करु नका" म्हणलं की ते त्यांनी केलंच म्हणुन समजा... म्हणुन मी त्यांना "FIRST AID" पण शिकवुन ठेवलंय. आपण कितीही प्रशिक्षण घेतले किंवा दिले तरीही शेवटी अपघात हे होतच असतात म्हणुन खबरदारीचे उपायसुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. एकदा सौ. ला LPG बद्द्लच्या धोक्यांविषयी आणि पाळावयांच्या सुरक्षेततेविषयी सगळी माहीती दिली तर ती म्हणाली मला तर हे सर्व माहीत आहे तरीसुद्धा तुम्ही मला हे का सांगताय?? मी म्हणालो ती माझी जबाबदारी आहे. जसे मी घरी परत येईपर्यंत तुम्ही माझी काळजी करता तसेच मी घराबाहेर पडलो की मला ह्या LPG नावाच्या सैतानाची काळजी लागलेली असते, म्हणुन सारखं सारखं सागावंसं वाटतं.. आणि तिला हे पण सांगितले की टाटा मोटर्समध्ये LPG विषयी कमालीची जागरूकता आहे.. आम्हाला वेळोवेळी विवीध सुरक्षा कारणांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. आणि तिला तसाही अभिमान आहेच टाटा मोटर्सचा पण तो आणखीच दुणावला. किचन ओटयावर आणि गॅस शेगडीच्या अवती भोवती झुरळांची दादागिरी चालते. कसलाही स्प्रे मारा, त्यांच्यावर असर म्हणुन होत नाही. मला तर ही झुरळं म्हणजे अश्वत्थाम्याचे वंशज वाटतात. अणुभट्टीमधे राहु शकतात हे प्राणी मग त्यांना गॅस शेगडीची काय तमा. मग त्यांना पळवुन लावण्यासाठी अनेक ऊपाययोजना ओघाने आल्याच. त्यातलाच एक उपाय म्हणजे स्प्रे पण जळत्या गॅससमोर स्प्रे वापरणे हे अत्यंत धोकादायक ज्याला आपण "HAZARDOUS" हा शब्द आपल्या कामामधे वापरतो.झुरळांचा स्प्रे हा जळत्या गॅससमोर वापरणे किती धोकादायक आहे हे माझ्या सौ. ला घड्लेल्या घटनांचा दाखला देत पटवुन दिलेले आहे. एक-दोन वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मी नेहमी सौ. ला सांगायचो की सीट बेल्ट लावणं किती महत्त्वाचं आहे आणि कारमधे बसल्या-बसल्या सीट बेल्ट लावायलाच पाहीजे. पण सहजासहजी ऐकेल ती पत्नी कसली.. नेहमी वेगवेगळी कारणे मला बांधल्यासारखंच वाटतं गाडीमधे, कायतर माझ्याकडे बॅगा आहेत, मला नाही आवडत सीटबेल्ट वगैरे वगैरे... एकदा अनायासे डेक्कनला गेलो होतो आणि तिकडुन परतताना लकडी पुल लागणारच होता.. म्हणलं आज होऊन जाऊ दे .. मी पण लावलेला सीट बेल्ट काढला आणि लकडी पुलावरुन आलो. नेमका सिग्नलला हवालदाराच्या समोरच येऊन थांबलो.. मग काय?? नेहमीचं तुम्हाला माहीतच आहे.. "घ्या साईडला" साईडला जाऊन कायदेशीररीत्या १०० रूपये दंड भरला. पण सौ. ला सांगितले ५०० रूपये भरले. तेव्हापासुन गाडीत बसल्या बसल्या सीट बेल्ट लावला जातो ट्रॅफ़ीकचा नियम म्हणुन नव्हे तर नव-याचे ५०० रूपये जाऊ नयेत म्हणुन. शेवटी १०० रूपये घालवुन सीट बेल्ट लावायला शिकुन घेतले. जे आपल्या हातात आहे किंवा ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवु शकतो त्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. नाहीतर तुम्ही विचाराल मग त्सुनामीसाठी काय उपाययोजना केली आहे? असे विचारणारे बहाद्दरपण असतात बरं का. पण त्सुनामीवर आपले नियंत्रण नाही आणि ठेवुही शकत नाही. पण असे काही धोके आहेत जे आपल्या नियंत्रणामधे राहु शकतात किंवा आपण त्यांच्यावर नियोजनबद्ध नियंत्रण मिळवु शकतो. जसे की आगीचा धोका. आग कशी लागते हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच.. आहे ना माहीती?? आग लागण्यासाठी प्रामुख्याने तीन घटक लागतात हवेतील ऑक्सीजन, ऊष्णता आणि कोणताही ज्वलनशील पदार्थ. मग आग लागु नये म्हणुन काय करायला पाहीजे... सांगा बरं... सोपं आहे... वरील तिन्ही घटक एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणे. आणि एवढं करुनही जर आग लागलीच तर आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला पाहीजे. आग विझवणे म्हणजेच आगीसाठी लागणारे तिन्ही घटक एकमेकांपासुन वेगळे करणे. पण कधी-कधी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि आगीमुळे होणारे नुकसानही जबरदस्त आर्थिक फ़टका देणारे असते. म्हणुन सर्वात खबरदारीचा ऊपाय म्हणजे आग लागु न देणे. आणि आग न लागण्यासाठी काय करायला पाहीजे ह्याचे सर्वांना प्रशिक्षण देणे. ईंश्युरंस वगैरे असतो पण मनाला होणा-या वेदना शमवण्याचा ईंश्युरंस अजुन निघायचाय. काहींना वाटेल की ईंश्युरंस कंपनी माझ्या कुटुंबाची काळजी घेईल आणि त्यांना सुरक्षा देईल पण तसं काही नसतं कित्येकदा ईंश्युरन्सच्या पैशांवरुन झालेली हाणामारी आपण वृत्तपत्रांमधुन वाचतो. पण ईंश्युरन्स हा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत देऊ शकतो सुरक्षेची भुमिका बजावु शकत नाही. आपल्या कुटुंबाची सुरक्षा तसेच आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्या सुरक्षेचे शिल्पकार आपणच आहोत. "त्वमेव केवलम" फ़क्त आपणच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या संस्थेची सुरक्षा योग्यपणे हाताळु शकतो. "दुस-यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला." याचबरोबर आपल्या स्वत:च्या सुरक्षेवर देखील काळजीपुर्वक लक्ष द्या. आणि नेहमी लक्षात ठेवा न विसरता "घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे". तुम्हां सर्वांना सेफ़्टी विकच्या हार्दीक शुभेच्छा. (ईंडस्ट्रीजमधे काम करणा-या माझ्या सर्व मित्रांसाठी) 4 ते 10 मार्चच्या सेफ़्टी विकच्या निमित्ताने... © Copyright Vijay Vasve

माझी सुरक्षा कविता !


लोखंडाशी खेळताना तुझे हात लोखंडासारखे झाले असतीलही, पण तरीही त्यांना लोखंडापासुन जपायला हवं.. हॅंडग्लोव्हज चे कवच तुझ्या हातांना देत जा, आणि "ईअर प्लग" च्या भिंती कानांना.... आता पेटवु सारे रान म्हणुन वा-यासारखा निघशील, पण निघताना "सेफ़्टी शुज" पहीला घाल, वा-याशी झुंज म्हणजे डोळ्यांची अग्निपरीक्षा, एका सेफ़्टी गॉगलने ती सहज पास होशील.. उत्तुंग मी अथांग मी म्हणत उंचावर जाशील, पण "वायर रोप" बांधलाय ना याची खात्री कर जर चुकुन तुझी अथांगता कमी पडली तर तो वायर रोप तुझा भार समर्थपणे पेलेल.... आपण म्हणजे कर्ण नव्हे.. कवचकुंडले असायला, म्हणुन काय झालं? पण आपण एवढे दीनही नाही ... सुरक्षा साधनसामुग्रीचा खच पडलाय आपल्या दिमतीला, तु फ़क्त आवाज दे, काय हवंय तुझ्या सुरक्षेला??? (ईंडस्ट्रीजमधे काम करणा-या माझ्या सर्व मित्रांसाठी) 4 ते 10 मार्चच्या सेफ़्टी विकच्या निमित्ताने... © Copyright Vijay Vasve

माझी अविस्मरणीय खेळी...


खरं तर माझ्यासारख्या सामान्य क्रिकेटरने अशा भानगडी करु नयेत. पण काय करणार एक खेळी मी अशी खेळलोय की आजही ती आठवली की क्रिकेट खेळल्याचं सार्थक वाटते. त्या खेळीची नशा काही औरच.. म्हणुन मी तिला ईथे कैद करायचं ठरवलंय. पुढे मागे वाचायला बरी पडेल.. आणि असेही फ़ेसबुक शतकानुशतके चालणार आहे.. मग होऊन जाऊ दे. मी अष्टपैलु म्हणुन खेळतो/खेळायचो. गोलंदाजी माझा मेन बिजनेस, नविन चेंडुवर माझी बोटे आणि मनगटाचा समन्वय जमला की मग कोणीही मी टाकलेला चेंडु बॅटच्या मधोमध खेळुन दाखवावा. आऊटस्वींग माझी खासियत, झोपेते जरी नविन लेदरचा चेंडु धरुन सोडला तरी आऊटस्वींगच होणार. ईतर गोलंदाजांना प्रयत्नाअंती मिळणारा आऊटस्वींग मला सहज जमतो. त्याचे कारण माझी साईड ऑन अ‍ॅक्शन. कै. सदु शिंदे साखळी स्पर्धेतील लॉ कॉलेज मैदानावरील सामना कॅनॉन क्लब विरुद्ध टेल्को रिक्रीएशन (TRC). नोव्हें २००८. लॉ कॉलेज मैदान मला तसं जवळ आहे पण आता पार पौड फ़ाट्याला वळसा घालुन SNDT मार्गे पोहोचावे लागते. त्यात ट्रॅफ़िकमधे अडकलो.. कॅप्टनचा फ़ोन.. "कुठे आहेस?? आम्ही पोहोचलोय लवकर ये.." आणि हे बोलताना तो हॅरीस पुलावर असणार हे नक्की.. त्याचं नेहमीचंच आहे ते.. मला त्याची सवय झाली होती. संदिप आहेर, आमचा कॅप्टन. मी ग्राऊंडवर पोहोचलो तर अर्थातच खेळाडुंनी भरलेली त्याची सुमो काही पोहोचलेली नव्हती. सामन्याच्या दिवशी ग्राऊंडवर पाय ठेवल्या ठेवल्या एक प्रकारचे फ़िलींग येते मनामधे कि आज मी काय करणार आहे किंवा एक चिकीत्सा होऊन जाते आपल्याच अंतर्मनाशी.. माझे अंतर्मन खदखदुन हसत होते.. मला काही कळाले नाही.. मी म्हणालो..च्यायला आपला गप्प खेळ करु जो होगा देखा जायेगा.. क्रिकेटचा पेहराव चढवुन एक राऊंड मारला आणि स्नायुंची ताणाताण करुन घेतली. हे मी नित्यनियमाने प्रत्येक सामन्याआधी करतोच. आवश्यकच आहे ते. संदिप टॉस हरला आणि आम्हाला फ़िल्डींग आली. शिंदे लीगमधे टॉस जिंकणारे कप्तान कधीही गोलंदाजी घेत नाहीत. का माहीत नाही? आता ४५ षटके फ़िल्डींग करायची होती..हु‘~श~श्श... नविन बॉलवरची माझी जादु काही चालली नाही. नविन बॉलवर मला एकही बळी मिळाला नाही :(. नंतर जुन्या-पान्या चेंडुवर एक बळी मिळाला. आजचा दिवस माझ्या गोलंदाजीचा नव्हताच, काहीच योगदान नाही. त्यात त्या वाघाबरोबर खरखर झाली. मी थ्रो घ्यायला स्टंपच्या मागेच थांबणार ना .. वाघ म्हणला, "माझ्या धावण्याच्या रेषेत येवु नको." आणि बरीच फ़णफ़ण केली त्याने.. माझी चुक नसताना मला ऊगाच डिवचलं त्याने. मी त्याच्या वयाचा विचार करून मुग गिळले. पण त्याने खरंच मला डिवचला होता. त्याला माझी बॅटच उत्तर देणार होती. आणि मी ही बॅटनेच उत्तर द्यायचे ठरवले. अविनाश शिदोरेने ५ बळी मिळवले. सुरेख गोलंदाजी केली त्याने. त्यांच्यातल्या प्रसाद आणि राकेशने अर्धशतके ठोकली. आम्ही त्यांना १९८/९ मधे रोखले. आम्ही मैदान सोडताना सर्व अविनाशच्या मागाहुन गेलो. उत्तम गोलंदाजीसाठीचा बहुमान. तसं पाहीलं तर लॉ कॉलेज मैदानावर १९९ धावांचा पाठलाग अगदी सोपा आहे. पहीली फ़लंदाजी करणारे हमखास २५० धावा लावतात. तिथं चेंडुला नुसता पंच दिला तरीही सीमापार जातो. अर्थात क्षेत्ररक्षकाला चुकवले तर. फ़र्ग्युसन सारखा माती प्रदेश लॉ वर नाही. लॉ कॉलेजचे पॅव्हीलीयन सुद्धा दिलखुलास आहे. माझ्या मते PDCA साठी उपलब्ध असलेल्या पॅव्हीलीयनपैकी सर्वात उत्तम. आम्ही सगळ्यांनी गोल सर्कल करुन भोजनाचा आनंद घेतला. माझी भाजी होती ओला घेवडा लपथपीत. माझ्याकडे पेटंट आहे ह्या भाजीचे.. हाहाहा.. मॅच म्हणलं की ओला घेवडा लपथपीत होऊन आलाच म्हणुन समजा. :P . त्याने फ़ॅटस वाढत नाहीत. लंचनंतर सगळे टंगळमंगळ करीत होते.. १९९ म्हणजे काय... असे करुन टाकु.. अशा अविर्भावात. तसं पाहीलं तर ते चुक पण नव्हतं कारण आमची फ़लंदाजी मजबुत होती. जशी जशी सामना पुन्हा चालु होण्याची वेळ जवळ येवु लागली तसतसे माझे अंतर्मन मला आवाज देऊ लागले की आज तु फ़लंदाजीसाठी जा.. आजचा दिवस तुझा आहे.. मलाही काय करावे सुचत नव्हतं. मग मी संदिपला म्हणालो," आज माझा सेंन्च्युरी करायचा मुड आहे, कधी जाऊ फ़लंदाजीला?". त्याला वाटलं १९९ मधे हा काय सेन्च्युरी करणार. पण तरीही त्याने मला निराश नाही केले, म्हणाला ५ नंबरला जा. आणि सेन्च्युरीचं बंगाल ऐकुन काहीजण मस्तपकी हसले सुद्धा. मी त्यांना जरा गप्प केले. सामना चालु झाला. आणि पॅडीने त्याची जादु चालवायला सुरुवात केली. पहीले दोन फ़लंदाज तर बघेपर्यंत पुन्हा तंबुत येऊन बसले होते. पॅडी म्हणजे पद्मनाभन. कमालीचा अनुभव असलेला स्विंग गोलंदाज. सळो की पळो करुन सोडले त्याने आमच्या फ़लंदाजांना. मी फ़लंदाजीस गेलो पण स्ट्राईक येईपर्यंत माझे ३ जोडीदार तंबुत परत गेले. होता होईस्तोवर ८ बाद ६३ धावा असताना दिनेश बोडके माझ्या जोडीला आला. आणि पॅव्हीलियनमधे फ़क्त स्नेहल पॅड बांधुन बसला होता. सगळा सामना आमच्या तिघांच्या जिवावर होता तेव्हा. आणि विरुद्ध टिम एकदम जिंकल्याच्या तो-यात. वाघ तर एकदम तो-यात होता आणि त्या सर्वांनी आपण सामना जिंकलोय असं जवळ जवळ गृहीत धरुन टाकलं होतं. फ़क्त आता सोपस्कार झाले की चला लवकर घरी जाऊ अशा अविर्भावात. पण मी वेगळ्याच मुड मधे गेलो होतो.. पावनखिंडीतले बाजीप्रभु, पुरंदरचा मुरारबाजी आणि सिंहगडावरचा तानाजी माझ्या डोळ्यासमोरुन जात होते. रक्ताने ऊसळी घेतली आणि मीही मुठी आवळल्या. आज होऊन जाऊ दे.. किसमें कितना है दम?. शेवटच्या चेंडुपर्यंत हार मानायची नाही .. काहीही होवो..असे मनाशी पक्क ठरवलं. षटकामधील वेळात दिनेशला माझी रणनीती सांगितली. फ़क्त एकेरी धावा घ्यायच्या.. काहीही होवो.. आपण बाद व्हायचे नाही. त्यानीही माझ्या "हो" मधे "हो" मिसळला.एकमेकांच्या हातावर पंच देत आम्ही क्रिजमधे गेलो. आणि पाहतो तर काय ३ स्लीप, २ पॉईंट, कव्हर, मिडऑफ़ आणि लेग साईडला अवघा एकच फ़िल्डर तोही शॉर्ट लेग. माझी चेष्टाच केली त्यांच्या कॅप्टनने. माझ्यासारख्या फ़लंदाजाला हे क्षेत्ररक्षण, अन तेही लॉच्या मैदानावर. मला अकराव्या क्रमांकावर आल्यासारखं क्षणभर वाटलं. मी जिभल्या चाटु लागलो.. माझ्यासाठी ते तुपरॊटी होतं. म्हणलं आता कोण मॅक्ग्राथ आहे बघावं तर समोर गोलंदाज होता आनंद काळे. हो तोच आनंद काळे ज्याने एकेकाळी मला बाद करुन खूप जल्लोष केला होता ईंटरडिव्हीजनमधे. क्रिकेटमधे कोणाचं उसणं ठेवु नये. तेव्हा परतफ़ेड करायची माझी वेळ होती. त्यांचा यष्टीरक्षक होता राजेश, माझा सिंहगड क्लबमधील जिवाभावाचा मित्र. त्याला ब-यापैकी माझा खेळ माहीत होता. त्याच्याकडे बघुन मी एक अर्थपूर्ण स्मितहास्य दिले आणि माझ्या मोहीमेला लागलो. त्यालाही जाणीव झाली की हे क्षेत्ररक्षण विजयसाठी योग्य नाहीये. तो बोललाही त्यांच्या कॅप्टनला पण काही उपयोग झाला नाही कारण त्याच्या कॅप्टनच्या मते त्यांनी सामना जिंकलेला होता. हे सर्व क्षणार्धात.. दिनेशच्या हातावर पंच देऊन गार्ड घेईपर्यंत. काळे कॉलेजच्या बाजुने गोलंदाजीस आला. काळेचा पहीलाच चेंडु बॅकफ़ुटवर जाऊन मिडविकेटच्या बाजुला फ़क्त पंच केला, नुसत्या पंचने चेंडु सिमापार गेला तोही जमिनीला बिलगुन, बॅटमधुन निघाल्यापासुन मुक्कामावर पोहोचेपर्यंत. आणि एक नयनमनोहर चौकार सर्वांना पहावयास मिळाला. पॅव्हीलियनमधुन झालेला टाळ्यांचा कडकडात आजही आठवतोय मला. खरंच छान स्ट्रोक होता तो, त्याने मला आत्मविश्वास दिला. मग त्याला सलग चार चौकार ठोकले आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. तसल्या क्षेत्ररक्षकांसमोर मी मॅक्ग्राथलाही झोडला असता, काळेची काय कथा?. चार चौकारांचा फ़ायदा असा झाला की दिनेशला सुद्धा ते पाहुन आत्मविश्वास मिळाला. त्याला मी पुन्हा बजावले की तु काहीही कर पण आऊट होऊ नकोस मी धावा करीन हवंतर. तोही पेटला मग. आम्ही मग मागे वळुन पाहीलेच नाही. एकेरी धावांवर भर देत आणि अधुन मधुन चौकारांची मदत घेत आम्ही १५० पर्यंत मजल मारली. त्यांची गोलंदाजी स्वैर होती, प्रत्येक षटकामागे एक तरी अवांतर धाव हमखास मिळत होती. आणि २-३ एकेरी धावा घेतल्या की RRR चं ओझं कमी होत होतं. टायमिंग छान होत होते आणि मी मारलेला प्रत्येक शॉट मी जसा योजुन मारायचो अगदी तसाच जाय़चा. क्रिकेटमधे प्रत्येकाचा दिवस असतो असं म्हणतात. आणि तो दिवस माझा होता. माझे अर्धशतकही लागले पण अर्धशतकाची तेव्हा कोणाला तमा होती, माझे लक्ष्य होते १९९ धावा. संघाचा विजय मला हवा होता. वाघाला सडेतोड उत्तर द्यायचे होते आणि ते पण माझ्या बॅटने. पण तेव्हाच दिनेशची विकेट गेली. अरे देवा ! हे काय झाले? काळजातुन कट्यार आरपार व्हावी असंच काहीसं वाटलं मला. एकतर आम्ही ८ बाद ६३ वरुन किल्ला लढवत आणला होता आणि आम्ही दोघांनीच तो पार करायचा असं ठरवलं होतं आम्ही. पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यालाही बाद झालेलं आवडलं नाही.. खूप निराश झाला तो. मित्राचे प्रॉमिस तोडल्याचं दु:ख त्याच्या चेह-यावर अनुभवलं मी. दिनेश जाताना "सॉरी विजु" म्हणुन गेला अगदी त्याच्या खोल हृदयातुन. मी त्याला "वेल प्लेड" म्हणुन अलविदा दिला. आणि सामना जिंकेन असा विश्वासही. दिनेशची २५ धावांची खेळी बहुमुल्य होती. दिनेश बाद झाल्यानंतर स्नेहल माने आला. त्यालाही मी समजावुन सांगितले पण संयमी फ़लंदाजी त्याचा पिंड नाही हे त्याने मला लगेच दाखवुन दिले. गुडघ्यावर बसुन त्याने मिडविकेटला सनसनीत चौकार खेचला. मस्तच एकदम.. त्याचा फ़लंदाजीतला विश्वास पाहुन मलाही हुरुप आला. ९ गडी बाद झाले होते आणि साधी चूकसुद्धा सामना गमावण्यासाठी पुरेशी ठरणार होती. स्नेहलपण नशीबाची साथ घेऊन आला होता त्याचे दोन मिडविकेट कडे भिरकावलेले स्लॉग स्वीप कत्ती लागुन शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरुन गेले अन धावाही मिळाल्या. जिंकण्यासाठी ३ धावा बाकी असताना स्ट्राईक घेतली. आता फ़क्त एक यशस्वी फ़टका सामन्याचा निकाल लावणार होता. आणि लेगस्पीनरसमोर स्नेहलला स्ट्राईक द्यायचा नव्हता. लेगस्पीनरने ऊंची दिलेला चेंडु पुढे सरसावत मिड ऑफ़ला फ़टकावला आणि फ़िल्डरने आड्वायच्या आत तो सीमारेषेपार झाला.. माझी मोहीम फ़त्ते.. सामना जिंकलो.. आणि तेव्हा माझी बॅट हवेत गेली.. दोन्ही हात ऊंचावुन माझ्या सवंगड्याना अभिवादन केले..जिंकलो रे...!! सगळे पॅव्हीलियन माझ्यासाठी क्रिजपर्यंत धावत आले आणि माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करु लागले.. सगळ्यांनी तोंडभरुन कौतुक केले... आकाश ठेंगणे कसे होते याचा जिवंत अनुभव घेतला... एक अशक्यप्राय विजय मी साध्य केला होता... नाहीतर ८ बाद ६३ वरुन ९ बाद २०२ वर पोहोचणे स्वप्नातही शक्य नाही. म्हणुनच ही खेळी अविस्मरणीय. लॉ कॉलेजच्या कॅंटिनमधे छॊटीशी पार्टीही झाली... अर्थातच माझ्याकडुन.. ३ दिवसांनंतर न्युजपेपर मधे नाव पण येऊन गेले. टेल्को रिक्रीएशन क्लब: ९ बाद १९८ (प्रसाद साळवी ५४, राकेश वाल्मिकी ५४, अविनाश शिदोरे ५/३७) पराभुत विरुद्ध कॅनॉन क्लब: ९ बाद २०२ (विजय वसवे नाबाद ८०)

अब जितना ही पडेगा.....(World Cup)


अब जितना ही पडेगा..... सचिन का आखरी वर्ल्ड कप है, उसके ताज मे और एक हिरा लगाना पडेगा.. ईसलिए कहता हुं अब जितना ही पडेगा..... वर्ल्ड कप फ़ायनल है, वहॉं रि-मॅच नहीं होती, जीत से बस एक कदम दुर है हम.... ईसलिए कहता हुं अब जितना ही पडेगा..... २८ साल हुए कप जिते हुए, देशवासियों से और ईंतजार ना करवाना... ईसलिए कहता हुं अब जितना ही पडेगा..... माना के बीसीसीआय के पास पैसा बहोत है, लेकीन खरीदा हुआ कप हमें नहीं चाहीए... ईसलिए कहता हुं अब जितना ही पडेगा..... अगर तुम जीत गये तो, पुर भारत में दिवाली-दशहरा होगा... ईसलिए कहता हुं अब जितना ही पडेगा..... अगर तुम खेले जी-जान से, तो कुबेर भी तुम्हारे घर आयेगा, ईसलिए कहता हुं अब जितना ही पडेगा..... -VIJAY VASVE(composer)

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...