Posts

Showing posts from September, 2022

हरीमुखे म्हणा...

Image
पुण्याची गणना कोण करी? "हरी मुखे म्हणा हरी मुखे...पुण्याची गणना कोण करी" मुखात हरीचे नाव आल्यावर जे पुण्य लाभते त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. ऐकायला किती साधे वाटते. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. काया, वाचा, मन आणि इंद्रियांच्या संयोगाने आपण ईतर जीवांना जो त्रास किंवा पीडा देतो ते म्हणजे पाप. एका क्षुद्र जीवाला त्रास दिल्याने पाप लागण्याचे काय कारण असावे बरे? कारण "हृदयेषु सन्निविष्टो". तुम्ही त्या जीवाला नाही तर त्याच्या हृदयात वास करणार्या प्रत्यक्ष भगवंताला त्रास देत असता. तुम्ही म्हणाल "कोण भगवंत?" तेच भगवंत "अहं सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते" हे अर्जुनाला सांगणारे. सर्व गोष्टींचा मालक मी आहे आणि माझ्यापासुनच सर्वकाही येते. जे जे दृश्य आणि अदृश्य आहे ते ते सर्व (सर्वस्य). हि पृथ्वी माझी, हा चंद्र माझा, हा सुर्य माझा, हे समुद्र माझे, ग्रह तारे माझे, एवढेच काय तु जो श्वास घेत आहेस तो वाराही माझाच आहे. ढगांतुन बरसणारा पाऊसही माझाच आहे. सर्वकाही भगवंतांचेच आहे. म्हणुन तुम्ही जेव्हा एखाद्या जीवाला पीडा देत...

आशिया कप अंतिम सामना २०२२

अशिया कप अंतिम सामना २०२२!  अपेक्षित होते कि आपला भारत आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळेल परंतु अपेक्षा या भंग होण्यासाठीच असतात हेही तेवढेच खरे आहे. क्रिकेटमुळे भारतीय बोर्डाकडे अमाप संपत्ती आली पण त्या श्रीमंतीला यशाने बर्याचदा हुलकावणीच दिलेली आहे. नाही म्हणायला आपला एक पंच अंतिम सामन्यात दिसत होता हेही नसे थोडके आणि रवि शास्त्रीचे समालोचन ऐकायला मिळणार होते. रविच्या समालोचनाविषयी काय बोलावे. खरं सांगायचे तर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकाची भुमिका निभावत असताना मला त्याच्या समालोचनाची खुप आठवण येत असे. रविवारच्या दिवशी व्हिस्की सोबत तंदुरी चिकन मिळाल्यावर जी मजा येते तीच मजा एखाद्या रंगतदार सामन्यात रवी शास्त्रीचे समालोचन ऐकताना येते. सध्या हिंदी समालोचन सुद्धा बहरत चाललेले आहे पण मला ते कमी कपडे घालुन लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करणार्या एखाद्या नुतन अभिनेत्रीसारखे वाटते म्हणुन मी त्याच्या वाटेला जात नाही. हिंदी समालोचन मला झेपत नाही. विशेष म्हणजे काल कोणतीही तिथी आडवी न आल्यामुळे व्हिस्कीचा एकेक थेंब घशाखाली उतरवत अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद घेता आला. अर्थातच मी श्रीलंकेच्या बा...