Saturday 20 April 2013

मानवीय कालगणना

"मानवीय कालगणना"
उपनिषदे आणि भगवद गीतेतील प्रमाणानुसार कालगणना अशी आहे;
सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि ही चार युगे एकामागुन एक चालु असतात.
चार युगे पुर्ण झाली की त्याला एक चतुर्युग म्हणतात.
अशी हजार चतुर्युगे झाली की ब्रम्हदेवाचा सुर्यास्त होतो (१२ तास)
भगवदगीतेतील श्लोक:
अध्याय ८, श्लोक १७ :
सहस्त्रयुगपर्यंन्तमहर्यद्ब्रम्हणो विदु: l
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेहोरात्रविदो जना: ll 
"मानवीय कालगणनेनुसार, एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रम्हदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक सहस्त्र चतुर्युगांची ब्रम्हदेवाची एक रात्र असते."


हा झाला गीतेतील श्लोक, निश्चित आठवत नाही पण बहुतेक मुंडक उपनिषदामधे कालगणना दिलेली आहे...ती अशी आहे.
सत्ययुग कालावधी- १७ लाख २८ हजार वर्षे
त्रेता युग कालावधी- १२ लाख ९६ हजार वर्षे
द्वापारयुग कालावधी- ८ लाख ६४ हजार वर्षे
कलियुग कालावधी- ४ लाख ३२ हजार वर्षे.
एवढी सगळी वर्षे म्हणजे एक चतुर्युग.
अशी हजार चतुर्युगे म्हणजे ब्रम्हदेवाचे १२ तास..
ब्रम्हदेवाला १०० वर्षे आयुष्य आहे..

ब्रम्हदेवाच्या मृत्युनंतर दिर्घ आयुष्याचे वरदान असलेल्या लोमष ऋषींच्या अंगावरील एखादा केस गळुन पडतो...
असे दिर्घ आयुष्याचे वरदान असलेले लोमष ऋषी म्हणतात..
"आयुष्य क्षणभंगुर आहे"... :D ..

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...